Thursday, August 24, 2017

छान छान गोष्टी


बेडूकमामा

पावसाळा आला पाऊस पडू लागला
सगळी जमीन भिजून गेली
जिकडे तिकडे हिरवेगार गवत रुजले
रामजी पाटील शेतात काम करीत होता.
शेताजवळच पाटलाची झोपडी होती.
सायंकाळी पाटील घरी आला.



तो काम करून दमला होता
झोपडीत येताच तो खाटेवर पडून राहिला.
बाहेर पाऊस पडतच होता
झोपडीच्या जवळच तिची तीन पिले होती
पावसामुळे पिलांना आनंद झाला
ती 'डराव डराव' करून ओरडू लागली.
बेडकी म्हणाली,
'बाळांनो, पाटील दमला आहे
तुमचे ओरडणे ऐकून तो रागावेल,
व आपणाला मारेल
यासाठी ओरडू नका.'
दोन पिलांनी आईचे ऐकले
पण तिसरे 'डरांव डरांव' करतच राहिले
पाटलाला ती कटक' आवडली नाही
तो खूप रागावला
आणि इकडे तिकडे पाहू लागला
जवळच एक बेडूक 'डरांव डरांव' करीत आहे,
असे पाटलाला दिसले.
पाटील उठला
बेडकापाशी आला
मग पाटलाने बेडकास पकडले,
व जोराने भिरकावून दिले
बेडूक एक दगडावर आपटला व मेला.



कावळा
एका जंगलात वडाचे मोठे झाड होते. त्या झाडावर एक कावळ्याचे जोडपे घरट्यात राहत होते. त्याच झाडाखालील बिळात एक साप रहात होता. हा साप त्या कावळ्यांची नजर चुकवून पिल्ले खाऊन टाकी.
दरवेळी असे झाल्याने कावळा-कावळी खूपच दु:खी होते. त्या सापाचा बंदोबस्त कसा करायचा या विचारात ते जोडपे नेहमी असे. जवळच एक कोल्हा रहात होता. त्या कोल्ह्याकडे जाऊन सापाचा बंदोबस्त करता येतो का ते विचारण्यासाठी कावळ्याने त्याची भेट घेतली.
कावळा कोल्ह्यास म्हणाला, ''दरवेळी आमची पिल्ले हा दुष्ट साप खाऊन टाकतो. या सापाला ठार मारण्याचा काही उपाय सांगशील तर उपकार होतील.'' कोल्हा म्हणाला, ''एखादेवेळी छोटासा प्राणी युक्तीने जी गोष्ट करतो तीच गोष्ट मोठा प्राणीही करू शकत नाही.''
कोल्ह्याने विचार बराच केला. तेवढ्यात त्याला एक कल्पना सुचली. त्याने ती कावळ्याला ऐकवली, ''एखाद्या नगरात जाऊन श्रीमंत किंवा राजघराण्यातील मौल्यवान वस्तू किंवा दागिना घेउन ये आणि त्या सापाच्या बिळात टाक. ज्याची वस्तू आहे तो तुमच्या पाठलागावर असणारच. बिळातली वस्तू काढण्यासाठी प्रथम सापाला ठार मारतील व आपली वस्तू ते घेऊन जातील.''
कावळ्यातला हा उपाय एकदम पटला. कावळा लगेच जवळच्या राजधानीत गेला. तेथील एका सरोवराजवळ काही राजस्त्रिया स्नान करीत होत्या. स्नानासाठी त्या स्त्रियांनी अंगावरचे दागिने काठावरच काढून ठेवले होते. कावळ्याने एक मौल्यवान हार उचलला आणि उडत जाऊ लागला. त्याच्यामागून राजाचे शिपाई धावत होते.
कावळ्याने तो हार बरोबर त्या सापाच्या बिळात टाकला. ते बघून शिपाई बिळ उकरू लागले. तेव्हा तो साप बाहेर आला. त्याबरोबर त्या शिपायांनी त्याला भाल्याने ठार मारले आणि तो हार घेऊन ते निघून गेले. कावळ्याच्या जोडप्याची चिंता दूर झाल्याने ते खुषीत होते.
उपदेश : काही प्रसंगी शूरांच्या शक्तीपेक्षा क्षुद्राची युक्तीच श्रेष्ठ ठरते.


No comments:

Post a Comment